Sunday 28 April 2013

आंधळ्याच्या गायी - मेघना पेठे (andhlyachya gayee-meghna pethe)

पुस्तकाचे नाव: आंधळ्याच्या गायी                                                               
लेखिका:मेघना पेठे
राजहंस प्रकाशन
पाने: १४३
किंमत:१५०
प्र आ : जून २०००                                                                           

   पुस्तकाबद्दल बरच बर वाईट ऐकुन होतो. लेखिकेच मी वाचलेलं नतिचरामी सामान्य मराठी वाचकासाठी तरी धाडसी लेखनामध्ये मोडतं त्यानंतर लेखिकेच वाचलेल दुसरं पुस्तक. हा कथासंग्रह आहे एकूण ५ कथांचा ज्या पूर्वी दिवाळी मासिकांमधून प्रसिद्ध झालेल्या आहेत.
  प्रत्येक कथा  वेगवेगळ्या जौनरची ,वेगवेगळे विषय ,जबरदस्त लिखाण शैली (आता ह्यामध्ये लेखिकेच बिनधास्त लिहीण  पण आलच ,जे काहीना अनावश्यक वाटत तर काहीना कथेची पात्रांची गरज वाटत उदा . मग ते व्यक्तीच वर्णन असो किंवा सेक्स बद्दल लिहिलेलं असो किंवा शिव्यांचा वापर असो ) . माझ्याबद्दल बोलायच झालं तर मला ते धाडसी वाटत…जीवनाकडे बघायचा ,ते व्यक्त करायची  प्रत्येकाची  आपापली स्टाईल असते  लेखकांची तर ती युनिक असते त्यामुळे मग पुढचा कीस काढत पुस्तक /लिखाण बाजूला पडाव अस मात्र होऊ नये,असो आता पुस्तकाकडे वळतो
          पहिली कथा "एक ननैतिक बघ्या "एका प्रौढ मुलाची ज्यात त्याचा बालपण कसं हरवल, त्याच्या मनाचे हिंदोळे ,कुत्र्या बरोबरचा  त्याचा संवाद मस्त . तितकीशी नाही जमलीये पण एकूण ठीक .
  दुसरी कथा -आये कुछ अभ्र हि तारुण्य उलटून जाणारया  तरीही लग्न न जमत असलेल्या तरुणीची गोष्ट. त्यात तिच्या कदाचित होणारया  नवरयाबरोबर तिची भेट,तिचे अनुभव ,हिजड्या बरोबरचा  प्रसंग ,तिची मनोवस्था ,मस्त लिहिलेय.
बाकी कथा अठरावा उंट ,सादोहरा व "आस्था आणि गवारीची भाजी" पण छान आहेत .शेवटची कथा मस्त जमलीये. धड एक कशावर पाय नसलेला ,प्रौढ साक्षरता अभियाणात  गर्क असलेला,स्वताच्याच आयुष्यात रमणारा ,मौजमजा करणारा नवरा,तात्विक चर्चेत अग्रेसर ----, कामामुळे  गांजून  गेलेली,नवर्याची  अपेक्षित साथ न लाभणारी  ,संसाराचा गाडा  चालवणारी ,मानसिक कोंडमारा झालेली त्याची बायको,------,स्वताः च्या टर्म्स वर आयुष्य जगणारी ,नवर्याबरोबर पूर्वी  लिव इन असणारी,कॅपेबल व इण्डिपेण्डनट अशी त्याची प्रेयसी    ह्या सगळ्याची कथा म्हणजे आस्था आणि गवारीची भाजी .पुस्तक एकूण ठीक आहे . म्हनजे एकदातरी जरूर वाचावे असे. काहीजणांना त्यातील भाषेवर आक्षेप असेल तरी लेखिकेची ताकत आपण बाजूला सारू शकत नाही . लेखिकेची मागे सांगितल्याप्रमाणे प्रसंग सांगण्याची शैली,कथा सादर करण्यची शैली,लेखनाची हातोटी निर्विवाद आहे.

मल पृष्ठावरील वाक्य:
"घटना घडतात. पुरातल्या ओंडक्यासारखी माणसं त्यात वाहून जातात. घडायचं ते घडून जातं... पण तरीही पर्याय असतातच ठाकलेले... तडफडण्याचे... हसण्याचे... रडण्याचे... हरण्याचे... जिंकण्याचे... क्षमेचे... सूडाचे... स्वीकृतीचे... तुकण्याचे... साक्षित्वाचे... त्यातला एकच निवडता येणार असतो आणि निवडावा तर लागणारच असतो! पर्यवसान ठाऊक नसताना अंधारात घ्यावी लागणारी उडी... माणसाच्या आयुष्यात नियत आहे ते हे. यालाच आपण स्वातंत्र्य म्हणतो!
जाणिवेचा लख्ख उजेड नाही आणि नेणिवेचा गच्च अंधार नाही, अशा तिन्हीसांजेला, अंधुक प्रकाशातल्या जुलमी रानात सोडाव्या लागणा-या या आंधळ्याच्या गायी... त्यांना म्हणे देव राखतो...!  आणि आंधळा? तो तर फक्त या भोळ्या विश्वासाची बासरी वाजवत रहातो"

पुस्तक श्राव्य स्वरुपात देखील उपलब्ध आहे:
http://www.maanbindu.com/new-marathi-audio-book-Aandhalyachya-Gayi

( ३.५ /५ )
प्रशांत मयेकर  २८/४/१३ १५: ५०

"हा महाराष्ट्र-पुरुष अति प्राचिन आहे. कधी दक्षिणापथ, दक्षिणखंड, 'म्हराष्ट्र' देश, दंडकारण्य अशा अनेक नावांनी व साजांनी ओळखला जाणारा.
अशा या वॄद्ध महाराष्ट्र-पुरुषाचे हे अस्फुट स्तोत्र आहे, हे रचण्यांतला हेतु काय ?
एवढाच की तो महाराष्ट्र-पुरुष दॄष्टीसमोर उभा ठाकावा, त्याचं झांवळें झांवळें दर्शन घडावं, परिचितांना पुनर्प्रत्ययाच्या लाभ व्हावा, जाणत्यांना खुण पटावी, अबोधांना बोध व्हावा व त्यांचे बाहु फुरफुरावेत.
आम्ही महाराष्ट्रिक कसें ? आमचे वैभव काय ? आमची महत्ता कशी ? आमचे गुण-दोष काय ? ह्या आणि अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे मिळावीत हाच या स्तोत्र-रचनेचा हेतु आहे.
महाराष्ट्राचा प्रत्येक धोंडा एकेका रोमहर्षक प्रसंगाचा साक्षी. त्याला जर कधी काळीं जिभा फुटल्या तर तो जे जे सांगेन ते ऐकुन प्रेते उठतील, कबंधे जिवंत होतील, षंढांच्याही अंगी वारे भरेल !
स्वातंत्रप्रियता ही तर महाराष्ट्राची अंगिक प्रवृत्ती.
इंग्रजांना संपुर्ण भारत जिंकण्यापुर्वी शेवटची लढाई इथल्याच ठेंगण्या, काळसर मावळ्यांशी खेळावी लागली. ती युद्धश्री, ती रग, तो आवेश अजुनही मावळला नाही, कधी मावळेल असे दिसतही नाही. हा गुण डोंगरावरुन वहात येणार्‍या भन्नाट वार्‍याचा आहे. कृष्णा, कोयना, पवना, भीमेच्या पाण्याचा आहे.
महाराष्ट्र श्रीमंत आहे, स्वाभिमानी तर आहेच आहे, कणखर आहे, चिवट आहे. मोडेल पण वाकणार नाही, मित्रांसाठी जीव देणारा आहे, भक्तिभावाने गहिवरणारा आहे, लढताना प्राण तळहाताशी घेणारा आहे, थोडासा भांडखोरही आहे आन थोडीशी हिरवटपणाची झाकही आहे. पण किती ? अहो चंद्रावरल्या डागाएवढी हो !
ज्याने महाराष्ट्रावर लोभ केला त्याच्या पायतळी आपला जीव अंथरण्यापुरता भोळा हा महाराष्ट्र आहे, आतिथ्यशील आहे.
किंअभुना तो आहे त्या गिरिशिखरावरील दैवतासारखा, शंभुमहादेवासारखा !
संतापला तर तिभुवने पेटवील आणि संतुष्ट झाला तर कारुण्याची गंगा वाहवील ...
त्या महाराष्ट्राचे हे दर्शन ... !!! "

Tuesday 9 April 2013

धार्मिक-अनिल अवचट (dharmik-anil avchat)

पुस्तकाचे नाव:धार्मिक     लेखक:अनिल अवचट      म्याजेस्टिक प्रकाशन  पाने :१६९     किंमत:१००
Dharmik :धार्मिक

पुस्तकाच्या मलपृष्ठावरील वाक्य:
*श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात फरक असतो का ?
काही मानवी मुल्यांवर अनिल अवचट यांची श्रद्धा आहे
जी श्रद्धा माणसाला व्यापक बनवते ,धर्म जात,देश यांपलिकडे जाऊन माणसाकडे माणूस म्हणून पाहायला शिकवते,एवढेच काय निसर्गातल्या प्राणी ,वनस्पती यासारख्या सर्व घटकांशी जुळवून घ्यायला शिकवते ती आवश्यक श्रद्धा आणि याउलट जी माणसाला संकुचित बनवते ती घातक श्रद्धा किंवा अंधश्रद्धा .
 भारतीय समाजातील हिंदू,मुस्लिम,ख्रिश्चन धर्मीयांमधील अंधश्रद्धांचा मागोवा घेणारे हे पुस्तक *
 पुस्तकात एकूण सहा कथा आहेत त्यामधून  माणसं ,स्थळ ,श्रद्धा अंधश्रद्धा यांच्या माध्यमातून लेखकाने भाष्य केल आहे .बुवबाई  हा निर्मलामाताजी वरचा लेख,शेखसल्ल्याचा उरूस हा पुण्यातील दर्ग्यात होणार्या उरुसाबाद्दलचा लेख त्यानंतर येणारा देवदादासिंवरचा लेख जो बराच  मोठा व माहितीपूर्ण आहे .त्यानंतर  आहे झपाटलेलं गाणगापूर ,बुवा वाघमारे,व इतस्थता.सर्व लिखाण फार अभ्यासपूर्वक निरीक्षण करून केलेल आहे.प्रत्येक  वेळा लेखक स्वतः त्या त्या व्यक्तींना,त्या घटनेशी संबधित लोकांना,त्या त्या जागाना भेट देऊन आले आहेत  व मगच आपले मत मांडलेले आहे.धार्मिक पुस्तकात लेखक प्रत्यक्ष अशी टीका करीत नाहीत पण सत्य काय ?लोकमत काय?खरी परीस्तिथी  काय ?ह्यावर ते तटस्थपणे भाष्य करतात .समाजातिल इतर भ्रामक समजुती कशा व समाज वेळोवेळी त्यांना कसा बळी पडतो हे पुराव्यानिशी लिहितात व ते बहुतांशी पटते देखील. सर्व लेख वाचून अस्वस्थ व्हायला होतं . हे अस आपल्या समजात घडतं?घडलंय ?यावर विश्वास बसत नाही .
 लेखकाच्या मते धर्म हा अवडंबर माजवूनही व्यक्त करता येतो आणि लोकोपयोगी कार्यातूनही व्यक्त करता येतो निवड आपण करायची आहे. हा असला नको त्या श्रद्धा किंवा अंधश्रद्धा नसलेला समाज एके काळी अस्तित्वात येईल अशी लेखकाला खात्री  आहे म्हणूनच त्यांच हे लेखनप्रयोजन.पुस्तक म्हणूनच जरूर वाचावे .