Monday 11 November 2013

चक्र-जयवंत दळवी (chakra -jaywant dalavi)

पुस्तकाचे नाव: चक्र
लेखक: जयवंत दळवी
म्याजेस्टिक प्रकाशन  पाने :१६७  किंमत १०० रु



  चक्र बद्दल बरच काही ऐकून होतो व शेवटी एकदाची कादंबरी हातात पडली. जयवंत दळवींची हि पहिलीच कादंबरी पण एक लेखक म्हणून ते किती भन्नाट लिहू शकतात ह्याची पुरेपूर साक्ष देणारी .
       कादंबरीचं background म्हणजे मुंबईतील एक झोपडपट्टी. पुस्तक सत्तर च्या दशकांत पूर्वार्धाला लिहिल गेलं  असल तरी अजूनही ते तितकंच वाचनीय आहे . झोपडपट्टीतील गरीब कुटुंब,त्यांची भाषा ,विचारसरणी,जगण्यासाठी करावा लागणारा आटापिटा ,बकाल पणाचे वास्तविक दर्शन अंगावर काटा आणते. आपल्यासारखा मध्यमवर्गीय पांढरपेशा माणूस अक्षरशः व्यतिथ होतो. कादंबरीत बकाल झोपडपट्टीत राहणाऱ्या बेन्वा ,त्याची आई,त्याचे मित्र ,तिथला तडीपार झालेला गुंड लुका ह्याच्या बरोबर कादंबरी पुढे जात राहते. त्याचे जीवनमान,आत्यंतिक गरिबीमुळे आलेलं अगतिक जीवन,एक वेळच्या भाकरीची भ्रांत असलेल्या रिकामटेकड्या माणसांची जगण्यासाठी चाललेली केविलवाणी धडपड त्यांनी झोपडपट्टी वासियांच्याच भाषेत समर्थपणे उभी केली आहे .
           पराकोटीच्या गरिबीमुळे माणूस कुठल्या थराला जाऊन वागतो,त्यामुळे त्याच्या सुंदर स्वप्नांची धूळधाण  कशी होते व  नियतीचे हे दुष्ट चक्र कसे चालू राहते हेच पुस्तकात अक्षरश जिवंत केलय व पुस्तकाचं नाव सार्थ केलय. पुस्तकात शिवराळ भाषा शिवराळ न वाटता वास्तववादाकडे झुकते त्यामुळे ते आक्षेपार्ह नाही वाटत .एकुन एकदा वाचण्यासाठी पुस्तक छान आहे. पण एकदमच मस्ट रीड असं मात्र नाही .

Tuesday 10 September 2013

vaanprashtha-ganesh devi

पुस्तकाचे नाव : वानप्रस्थ
लेखक:गणेश देवी
पद गंधा प्रकाशन ,पाने १९९
पुस्तकाच नाव वाचून वानप्रस्थाश्रमा विषयी  असे वाटून मी पुस्तक वाचायला घेतले.सुरुवात फारच शाब्दिक आहे म्हणजे वाचायला जड ,विवेचन पर लेख आहे नंतर मात्र काही काळ पुस्तक वेग पकडते.      
गणेश देवी स्वतः नावाजलेले लेखक तर आहेतच त्याशिवाय विचारवंत व समाजसेवक म्हणूनही त्यांच कार्य प्रचंड आहे. आदिवासींसाठी गुजरातेतील तेज् गड येथे संस्था उभारून त्या समाजासाठी मौलिक कार्य कार्य्ण्यात त्यांचा सिंहाचा वाट आहे. पुस्तकातील पुढील कथा त्यांचा साहित्य प्रसार केंद्रासाठी लढा,त्यातील घडामोडी ,चढ उतार यांनी भरलेल्या आहेत नंतर किक्यारीया ह्या कथेत गुजरातेतील धार्मिक दंगलीच्या वास्तवावर व त्या पार्श्व भूमीवर आदिवासिच्न्हा सहभाग ह्यावर अत्यंत तठ्स्थ व तार्किक मते मंडळी आहेत(काही अंशी जी मला अजिबात पटली नाहीत ,त्यांचा सूर BJP ,VSP ,बजरंग दल विरोधातच आहे).बकि कथा वानप्र स्था विषयी,जंगलांविषयी अशी सरमिसळ अहे. एकूण पुस्तक वाचण्याजोग असलं तरी मस्ट रीड असा काही नाहीये पण काही बाबतीत नवीन माहिती व विचारदृष्टी नक्कीच देऊन जातं.
   ह्या पुस्तकाला सहा अवार्ड्स मिळालेले आहेत त्यापैकी दुर्गा भागवत मेमोरिअल अवार्ड व महाराष्ट्र फौंडेशन अवार्ड हे देखील आहेत .एकुन पुस्तकात आदिवासींची हलाखीची परिस्थती ,त्यांच जीवनमान ,त्यांच्यापुढील संघर्ष ह्यांची जाणीव वाचकाला नक्कीच होते.

Monday 2 September 2013

बालकांड-ह मो मराठे ( Balkand- ha mo marathe )

पुस्तकाचे नाव : बालकांड ,
लेखक : ह मो मराठे
म्याजेस्टिक प्रकाशन
पाने: ३३२

             बालकांड वाचल आणि सुन्न व्हायला झालं. एखाद्याचं आयुष्य असही असू शकत याची सर्वसामान्य माणसाला कल्पनाही करता येणार नाही असं उतार चढावानि भरलेलं आयुष्य किंबहुना त्या आयुष्याचा एक छोटा कालखंड लेखकाने ह्या पुस्तकात लिहिला आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हे त्यांचे आत्मचरित्र नव्हे ,कादंबरीही नव्हे त्याला ते आत्मकहाणी म्हणतात. बालकांड हि त्यांच्या बालपणीची खरीखुरी गोष्ट आहे. त्यांच्या वयाच्या सातव्या वर्षी हि कथा सुरु होते व बाराव्या वर्षी संपते असे असले तरी मराठी साहित्यातील एक अत्युत्कृष्ट अशी साहित्यकृती लेखकाने निर्माण केलेली आहे ह्यात वाद नहि.
         ह्या पुस्तकाबद्दल काही लिहिण्याच्या आधी माझ्या हातात ह.  मों.  च न लिहिलेले विषय हे छान पुस्तक आल त्यात त्यांनी ह्या पुस्तकाबद्दल फार समरसून लिहिलंय म्हणजे निर्मितीप्रक्रिया व त्यानंतरचे अनुभव वगैरे त्यामुळे त्यांच्याच शब्दात इथे वर्णन देण्याचा मला मोह आवरत नाहीये त्यापेक्षा असा म्हणेन कि चांगले शब्द सापडत नाहीयेत त्यामुळे ह्या पुस्तकाबद्दल त्यांच्याच शब्दात (पुस्तकातून)त्यांनी सांगितलेली काही माहिती मी इथे देतोय :
          माझी कथा बालकांड मध्ये आहे पण ती केवळ माझी एकट्याची नहि. माझे वडील ,आई,भाऊ ,इतर भावंड,झाडंपेडं  ,परिसर यांचीसुद्धा हि गोष्ट आहे. माझ्या बालपणीच्या गोष्टीत ह्या सर्वांची गोष्टपण गुंफली गेली आहे अनेक पात्रांची मिळून ती गोष्ट झाली आहे. एका कुटुबांच्या उध्वस्त होण्याची,हाल अपेष्टांची ,काही स्वभाव्जन्य दोषांतून निर्माण झालेल्या अनर्थ परंपरां ची आणि नियतीच्या अदृश्य अशा काळाशार सावलीचीही ती गोष्ट झाली आहे.
          हि गोष्ट पाच सहा ठिकाणी घडते क़ोकणातल्या सावंतवाडीच्या जवळचं झोळम्ब नावच खेडं, गोव्यातल सुर्ल नावच खेडं ,तिथली तेलबांध नावाची वाडी,गोव्यातल नानोडा गाव,नरसोबाची वाडी अशा ठिकाणी हि गोष्ट घडते.
         त्यांचे  वडील(ते  त्यांना काका म्हणत ) झोळम्बे गावी माडा पोफळीची बाग वसवून होते त्या जमिनीत रात्रं दिवस कष्ट करून त्यांनी ठिकाण उभ केला होतं. झाडा पेडाची लागवड केली,उत्पन्न घेतल ,उपजीविका केली .स्वभ:व विचित्र,तापट. त्यांच्या स्वभावाचं  एक चक्र असे दर दीडदोन वर्षांनी अतिउत्साही मनस्थिती तर दीडदोन वर्षांनी आत्यंतिक नैराश्य.त्याचा लेखकाच्या  व त्यांच्या कुटुंबाच्या आयुष्यावर फार परिणाम झाला. शेजाऱ्या पाजारयान्शी भांडणं ,गावकर्यांशी भांडणं,जुगार खेळण,बाई ठेवण,तीर्थयात्रा असे सगळे (परस्परविरोधी)प्रकार त्यांच्या वडिलांनी केले. 
     गावातील जमिनीच्या वादावरून त्यांनी चक्क गाव सोडून जायचा निर्णय घेतला सगळे सामान-सुमान लिलाव करून विकून टाकले . बाग अशा माणसाला विकली कि ज्याने पैसे देखील वेळेवर दिले नहित. व मोजक्या सामानानिशी व कुटुंबाला घेऊन तीर्थयात्रा करत ते सुर्ल या ठिकाणी आले. तिथे त्यांच्या आईला गंभीर व विचित्र अशा दुखण्याने घेरले .ति किंचाळू लहाली भुंकू लागली .दुखन विकोपाला जाऊन त्यातच ती हाल हाल होऊन वारली .त्याआधी त्यांची तीन चार महिन्यांची नवजात बहिण तीर्थयात्रा करतानाच वारलि.
            त्यानंतर त्यांचे वडील दोघा मुलांना घेऊन नरसोबाच्या वाडीला गेले व दारोदार माधुकरी मागून त्यांनी वर्ष काढल. त्यानंतर पुन्हा सुर्ल व तेथे दार व भिंती नसलेल्या झोपडीत (खोपीत)ते राहायला लागले.त्य काळात खायला असल तर असल नाहीतर नाही अशी स्तिथी होती. जवळ पैसे नाहीत ,कर्ज झालेलं  अशा परिस्थितीत रानातल्या कडु कंदमुळा वर गुजराण करीत त्यांनी दिवस काढले. सुर्ल्याला काही होत नाही बघून ते पुन्हा झोळम्ब्याला आले तेथे उन्हाळ्याच्या दिवसात राहण्याची काही सोय नसल्यामुळे एका मोठ्या आंब्याच्या झाडाखालीच राहू लागले.
      दरम्यानच्या काळात वडिलांच्या विक्षिप्त पणाला कंटाळून त्यांच्या मोठा भाऊ पळून जातो कालांतराने तिघे एकत्र यॆउन लेखकाची कशीबशी शाळा सुरु होते. वडिलांच्या विरोधास न जुमानता लेखकाचा मोठा भाऊ त्यांच्या मागे  उभा राहून त्यांना शिक्षण घेण्यास पाठींबा देतो अन हे कथानक संपते.
        पूर्ण पुस्तकात /कथेत लेखकाची व त्याच्या कुटुंबाची त्यांच्या वडिलांच्या स्वभावामुळे होणारी विलक्षण  ससेहोलपट व विस्कळीत आयुष्य ह्यांचे खरेखुरे रेखाटन आहे क़ुठेहि लेखकाने अतिशयोक्ती केलेली नाहि.पुस्तक वाचताना अक्षरशः डोळ्यात पाणी आल्यावाचून रहात नाही. लेखकाच्याच म्हण्याप्रमाणे धाडशी, कष्टाळू ,बेफिकीर ,भन्नाट ,थोडेसे मानसिक विकृतीचे बळी ,बेफाट पण दुर्दैवी असं वडिलांचं पात्र आहे जे पूर्ण कथेवर पसरून राहिल आहे.
अनेक वेळा आपल्याला लेखकांच्या वडिलांचा पराकोटीचा राग येतो ,लगनग्या हनुबद्दल कळवळा  येतो आपण त्यांचं आयुष्य समरसून अनुभवतो इतक उत्कट लेखन लेखकाने केलेल आहे. वर्णन करण्यापेक्षा स्वतः वाचण म्हणजे भन्नाट अनुभव आहे.पुस्तक जरूर वाचावे.
रिव्यू :
आपल्या बालवयातल्या अभावग्रस्त आयुष्याचे, वडिलांच्या विक्षिप्त, उग्र स्वभावामुळे, हुकूमशाही वृत्तीमुळे अधिकच खडतर झालेल्या जगण्याचे, स्वत:च्या व कुटुंबियांच्या पराकोटीच्या शोषणाचे कलात्मक तटस्थतेने साधलेले अतिशय संयत व मर्मग्राही चित्रण "बालकांड"मध्ये आढळते.
-- केशवराव कोठावळे पुरस्कार समितीचा अभिप्राय
'बालकांडशी तुलना करता येईल असं एखादं पुस्तक आता जागतिक साहित्यात शोधायला हवं.
-- विनय हर्डीकर
 

Saturday 31 August 2013

वाफाळलेले दिवस लेखक: प्रतिक पुरी (vafalalele diwas -pratik puri)

पुस्तकाचे नाव: वाफाळलेले दिवस
लेखक: प्रतिक पुरी 
गोल्डन पेज पब्लिकेशन
पाने १५५
किंमत:१७५
प्र आ :एप्रिल १३
        प्रस्तुत पुस्तकात लेखकाने शालेय जीवनात असणाऱ्या मुलांच्या मानसिकतेचे मस्त चित्रण केलेलं आहे. मुख्यत्वे आपल्याला काय सांगायचंय ते लेखक सुरुवातीलाच प्रस्तावना असं न लिहिता भूमिका या सदरात मांडतो.
                हि भूमिका वाचली कि पुस्तकात काय असणार आहे व कशाबद्दल असणार आहे याची कल्पना येते. लेखकाच्याच शब्दात ते उत्तम प्रकारे मांडता येईल : वयात येणाऱ्या मुलांच्या जीवनात घडणाऱ्या शाररीक आणि मानसिक उलथा पालथीचा वेध "वाफाळलेले दिवस "ह्या कादंबरीत घेतला आहे. पुस्तक हे वयात येण्यासंबंधी आहे. एका आठवीत गेलेल्या मुलाच्या प्रथम पुरुषी निवेदनातून त्याच स्वत:च आणि त्याच्या मित्राचं वयात येणं दर्शवलं गेलं आहे. कादंबरीचा पौगंडावस्थेतिल नायक वयात येताना मनात व शरीरात होणारे बदल कसे स्वीकारतो ,त्यावर त्याच्या काय प्रतिक्रिया उमटतात याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
          कथेचा नायक त्याचं कुटुंब ,मित्रपरिवार -दुनियादारी माहित असलेला इरसाल मित्र नित्या, अव्या, गौरु,वर्गमैत्रिणी व निंबाळकर म्हणजे कथेची नायिका ,ह्यामधून गुंफत कथा पुढे जात राहते .त्यमधे लेखकाने पौगंडावस्थेतील  अनेक स्तिथ्यंतऱ हाताळली आहेत तीदेखील रोकठोक शब्दात.
           लेखकाच्या म्हणण्याप्रमाणे यातील भाषा  शिवराळ व अश्लील असण्याचा आरोप / आक्षेप असू शकतो पण त्यात अतिशयोक्ती मात्र नाही,कथानायक हाच कथा सांगत असल्यामुळे भरपूर प्रमाणात शिव्यांचा वापर व रावडी बोलीभाषेचा वापर होतो. हा वापर पूर्णपणे नाकारता येत नसला तरी अगदी सरसकट सर्वांच्या बाबतीत मात्र हे पचनी पडेल असे नव्हे. म्हणजे सरसकट प्रत्येक शाळकरी मुलगा हीच भाषा वापरतो असे नव्हे त्यामुळे साहजिकच कादंबरी सामान्य वाचाकांसाठी किंवा पांढरपेश्या स्वभावाच्या वाचकांसाठी तरी( विशेषतः मराठी साहित्यात इतके रोकठोक लिखाण क्वचितच आढळते असे असताना)किंचित अश्लीलतेकडेच झुकणारी आहे असे माप पडेल .तरी कादंबरी जशी ज्याच्या मनाला भिडेल /पटेल तसा त्याचा त्याने तिने स्वीकार करावा व करूही नका असं लेखकाने सांगीतलच आहे. 
        एकूण लेखन छान आहे . तरी काही वाक्ये कृत्रिम वाटतात (आपण साले साहित्यिक तर नाही ना  बनणार)तर काही वेळा काही घटना न्याचरली येत नाहीत असे वाटते. पण ते अपवादात्मक.एकुन लेखकाची प्रथम कादंबरी असूनदेखील स्तुत्य लेखन केले आहे. नजीकच्या काळात दुसरा विषय हाताळताना किंवा वाचकांनी वाचताना लेखकाची खरी कस लागेल.

Thursday 29 August 2013

यक्षांची देणगी -जयंत नारळीकर (yakshachi denagi -jayant naralikar )

पुस्तकाचे नाव : यक्षाची देणगी   लेखक :जयंत नारळीकर  मौज प्रकाशन पाने २३७  किंमत: १५०


 जयंत नारळीकर हे नावाजलेले वैज्ञानिक व लेखकही. त्यांच्या मते विज्ञानाची माहिती आणि वैज्ञानिक दृष्टीकोन यांचा प्रचार आवश्यक आहे अनेक माध्यमे उपलब्ध असली तरीही वैज्ञानिकांमध्ये ह्याबाबतीत उदासीनता दिसून येते. प्रस्तावनेत त्यांनी लिहिलेय कि "विज्ञानाची गोळी जर कडू लागत असेल तर त्याला साखरेचे कोटिंग म्हणजे कथेचे रुपं देणे योग्य ठरेल. विज्ञानकथा अशा उद्देशाने लिहिल्या जाव्यात असे मला वाटते व निदान मी लिहितो त्या कथा तरी ह्याच उद्देशाने लिहिलेल्या आहेत".
               पुस्तकात एकूण १२   कथा आहेत व त्या सगळ्या सुरस आहेतच व आपल्याला बरीच नवीन वैज्ञानिक माहिती देतात जी रोज ऐकुन पण आपण दुर्लक्षित करतो अशीही . अनेक कथांमधून आपल्याला नवनवीन माहिती मिळत जाते. पुस्तक नक्कीच वाचनीय आहे. हातात  घेतल्यावर खाली ठेवावे असे वाटत नाही . लेखनशैलीही छान  आहे.

Sunday 28 April 2013

आंधळ्याच्या गायी - मेघना पेठे (andhlyachya gayee-meghna pethe)

पुस्तकाचे नाव: आंधळ्याच्या गायी                                                               
लेखिका:मेघना पेठे
राजहंस प्रकाशन
पाने: १४३
किंमत:१५०
प्र आ : जून २०००                                                                           

   पुस्तकाबद्दल बरच बर वाईट ऐकुन होतो. लेखिकेच मी वाचलेलं नतिचरामी सामान्य मराठी वाचकासाठी तरी धाडसी लेखनामध्ये मोडतं त्यानंतर लेखिकेच वाचलेल दुसरं पुस्तक. हा कथासंग्रह आहे एकूण ५ कथांचा ज्या पूर्वी दिवाळी मासिकांमधून प्रसिद्ध झालेल्या आहेत.
  प्रत्येक कथा  वेगवेगळ्या जौनरची ,वेगवेगळे विषय ,जबरदस्त लिखाण शैली (आता ह्यामध्ये लेखिकेच बिनधास्त लिहीण  पण आलच ,जे काहीना अनावश्यक वाटत तर काहीना कथेची पात्रांची गरज वाटत उदा . मग ते व्यक्तीच वर्णन असो किंवा सेक्स बद्दल लिहिलेलं असो किंवा शिव्यांचा वापर असो ) . माझ्याबद्दल बोलायच झालं तर मला ते धाडसी वाटत…जीवनाकडे बघायचा ,ते व्यक्त करायची  प्रत्येकाची  आपापली स्टाईल असते  लेखकांची तर ती युनिक असते त्यामुळे मग पुढचा कीस काढत पुस्तक /लिखाण बाजूला पडाव अस मात्र होऊ नये,असो आता पुस्तकाकडे वळतो
          पहिली कथा "एक ननैतिक बघ्या "एका प्रौढ मुलाची ज्यात त्याचा बालपण कसं हरवल, त्याच्या मनाचे हिंदोळे ,कुत्र्या बरोबरचा  त्याचा संवाद मस्त . तितकीशी नाही जमलीये पण एकूण ठीक .
  दुसरी कथा -आये कुछ अभ्र हि तारुण्य उलटून जाणारया  तरीही लग्न न जमत असलेल्या तरुणीची गोष्ट. त्यात तिच्या कदाचित होणारया  नवरयाबरोबर तिची भेट,तिचे अनुभव ,हिजड्या बरोबरचा  प्रसंग ,तिची मनोवस्था ,मस्त लिहिलेय.
बाकी कथा अठरावा उंट ,सादोहरा व "आस्था आणि गवारीची भाजी" पण छान आहेत .शेवटची कथा मस्त जमलीये. धड एक कशावर पाय नसलेला ,प्रौढ साक्षरता अभियाणात  गर्क असलेला,स्वताच्याच आयुष्यात रमणारा ,मौजमजा करणारा नवरा,तात्विक चर्चेत अग्रेसर ----, कामामुळे  गांजून  गेलेली,नवर्याची  अपेक्षित साथ न लाभणारी  ,संसाराचा गाडा  चालवणारी ,मानसिक कोंडमारा झालेली त्याची बायको,------,स्वताः च्या टर्म्स वर आयुष्य जगणारी ,नवर्याबरोबर पूर्वी  लिव इन असणारी,कॅपेबल व इण्डिपेण्डनट अशी त्याची प्रेयसी    ह्या सगळ्याची कथा म्हणजे आस्था आणि गवारीची भाजी .पुस्तक एकूण ठीक आहे . म्हनजे एकदातरी जरूर वाचावे असे. काहीजणांना त्यातील भाषेवर आक्षेप असेल तरी लेखिकेची ताकत आपण बाजूला सारू शकत नाही . लेखिकेची मागे सांगितल्याप्रमाणे प्रसंग सांगण्याची शैली,कथा सादर करण्यची शैली,लेखनाची हातोटी निर्विवाद आहे.

मल पृष्ठावरील वाक्य:
"घटना घडतात. पुरातल्या ओंडक्यासारखी माणसं त्यात वाहून जातात. घडायचं ते घडून जातं... पण तरीही पर्याय असतातच ठाकलेले... तडफडण्याचे... हसण्याचे... रडण्याचे... हरण्याचे... जिंकण्याचे... क्षमेचे... सूडाचे... स्वीकृतीचे... तुकण्याचे... साक्षित्वाचे... त्यातला एकच निवडता येणार असतो आणि निवडावा तर लागणारच असतो! पर्यवसान ठाऊक नसताना अंधारात घ्यावी लागणारी उडी... माणसाच्या आयुष्यात नियत आहे ते हे. यालाच आपण स्वातंत्र्य म्हणतो!
जाणिवेचा लख्ख उजेड नाही आणि नेणिवेचा गच्च अंधार नाही, अशा तिन्हीसांजेला, अंधुक प्रकाशातल्या जुलमी रानात सोडाव्या लागणा-या या आंधळ्याच्या गायी... त्यांना म्हणे देव राखतो...!  आणि आंधळा? तो तर फक्त या भोळ्या विश्वासाची बासरी वाजवत रहातो"

पुस्तक श्राव्य स्वरुपात देखील उपलब्ध आहे:
http://www.maanbindu.com/new-marathi-audio-book-Aandhalyachya-Gayi

( ३.५ /५ )
प्रशांत मयेकर  २८/४/१३ १५: ५०

"हा महाराष्ट्र-पुरुष अति प्राचिन आहे. कधी दक्षिणापथ, दक्षिणखंड, 'म्हराष्ट्र' देश, दंडकारण्य अशा अनेक नावांनी व साजांनी ओळखला जाणारा.
अशा या वॄद्ध महाराष्ट्र-पुरुषाचे हे अस्फुट स्तोत्र आहे, हे रचण्यांतला हेतु काय ?
एवढाच की तो महाराष्ट्र-पुरुष दॄष्टीसमोर उभा ठाकावा, त्याचं झांवळें झांवळें दर्शन घडावं, परिचितांना पुनर्प्रत्ययाच्या लाभ व्हावा, जाणत्यांना खुण पटावी, अबोधांना बोध व्हावा व त्यांचे बाहु फुरफुरावेत.
आम्ही महाराष्ट्रिक कसें ? आमचे वैभव काय ? आमची महत्ता कशी ? आमचे गुण-दोष काय ? ह्या आणि अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे मिळावीत हाच या स्तोत्र-रचनेचा हेतु आहे.
महाराष्ट्राचा प्रत्येक धोंडा एकेका रोमहर्षक प्रसंगाचा साक्षी. त्याला जर कधी काळीं जिभा फुटल्या तर तो जे जे सांगेन ते ऐकुन प्रेते उठतील, कबंधे जिवंत होतील, षंढांच्याही अंगी वारे भरेल !
स्वातंत्रप्रियता ही तर महाराष्ट्राची अंगिक प्रवृत्ती.
इंग्रजांना संपुर्ण भारत जिंकण्यापुर्वी शेवटची लढाई इथल्याच ठेंगण्या, काळसर मावळ्यांशी खेळावी लागली. ती युद्धश्री, ती रग, तो आवेश अजुनही मावळला नाही, कधी मावळेल असे दिसतही नाही. हा गुण डोंगरावरुन वहात येणार्‍या भन्नाट वार्‍याचा आहे. कृष्णा, कोयना, पवना, भीमेच्या पाण्याचा आहे.
महाराष्ट्र श्रीमंत आहे, स्वाभिमानी तर आहेच आहे, कणखर आहे, चिवट आहे. मोडेल पण वाकणार नाही, मित्रांसाठी जीव देणारा आहे, भक्तिभावाने गहिवरणारा आहे, लढताना प्राण तळहाताशी घेणारा आहे, थोडासा भांडखोरही आहे आन थोडीशी हिरवटपणाची झाकही आहे. पण किती ? अहो चंद्रावरल्या डागाएवढी हो !
ज्याने महाराष्ट्रावर लोभ केला त्याच्या पायतळी आपला जीव अंथरण्यापुरता भोळा हा महाराष्ट्र आहे, आतिथ्यशील आहे.
किंअभुना तो आहे त्या गिरिशिखरावरील दैवतासारखा, शंभुमहादेवासारखा !
संतापला तर तिभुवने पेटवील आणि संतुष्ट झाला तर कारुण्याची गंगा वाहवील ...
त्या महाराष्ट्राचे हे दर्शन ... !!! "

Tuesday 9 April 2013

धार्मिक-अनिल अवचट (dharmik-anil avchat)

पुस्तकाचे नाव:धार्मिक     लेखक:अनिल अवचट      म्याजेस्टिक प्रकाशन  पाने :१६९     किंमत:१००
Dharmik :धार्मिक

पुस्तकाच्या मलपृष्ठावरील वाक्य:
*श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात फरक असतो का ?
काही मानवी मुल्यांवर अनिल अवचट यांची श्रद्धा आहे
जी श्रद्धा माणसाला व्यापक बनवते ,धर्म जात,देश यांपलिकडे जाऊन माणसाकडे माणूस म्हणून पाहायला शिकवते,एवढेच काय निसर्गातल्या प्राणी ,वनस्पती यासारख्या सर्व घटकांशी जुळवून घ्यायला शिकवते ती आवश्यक श्रद्धा आणि याउलट जी माणसाला संकुचित बनवते ती घातक श्रद्धा किंवा अंधश्रद्धा .
 भारतीय समाजातील हिंदू,मुस्लिम,ख्रिश्चन धर्मीयांमधील अंधश्रद्धांचा मागोवा घेणारे हे पुस्तक *
 पुस्तकात एकूण सहा कथा आहेत त्यामधून  माणसं ,स्थळ ,श्रद्धा अंधश्रद्धा यांच्या माध्यमातून लेखकाने भाष्य केल आहे .बुवबाई  हा निर्मलामाताजी वरचा लेख,शेखसल्ल्याचा उरूस हा पुण्यातील दर्ग्यात होणार्या उरुसाबाद्दलचा लेख त्यानंतर येणारा देवदादासिंवरचा लेख जो बराच  मोठा व माहितीपूर्ण आहे .त्यानंतर  आहे झपाटलेलं गाणगापूर ,बुवा वाघमारे,व इतस्थता.सर्व लिखाण फार अभ्यासपूर्वक निरीक्षण करून केलेल आहे.प्रत्येक  वेळा लेखक स्वतः त्या त्या व्यक्तींना,त्या घटनेशी संबधित लोकांना,त्या त्या जागाना भेट देऊन आले आहेत  व मगच आपले मत मांडलेले आहे.धार्मिक पुस्तकात लेखक प्रत्यक्ष अशी टीका करीत नाहीत पण सत्य काय ?लोकमत काय?खरी परीस्तिथी  काय ?ह्यावर ते तटस्थपणे भाष्य करतात .समाजातिल इतर भ्रामक समजुती कशा व समाज वेळोवेळी त्यांना कसा बळी पडतो हे पुराव्यानिशी लिहितात व ते बहुतांशी पटते देखील. सर्व लेख वाचून अस्वस्थ व्हायला होतं . हे अस आपल्या समजात घडतं?घडलंय ?यावर विश्वास बसत नाही .
 लेखकाच्या मते धर्म हा अवडंबर माजवूनही व्यक्त करता येतो आणि लोकोपयोगी कार्यातूनही व्यक्त करता येतो निवड आपण करायची आहे. हा असला नको त्या श्रद्धा किंवा अंधश्रद्धा नसलेला समाज एके काळी अस्तित्वात येईल अशी लेखकाला खात्री  आहे म्हणूनच त्यांच हे लेखनप्रयोजन.पुस्तक म्हणूनच जरूर वाचावे . 

Monday 25 March 2013

शुभ्र काही जीवघेणे-अंबरीश मिश्र (shubra kahi jeevghene-ambarish mishr)

पुस्तकाचे   नाव: शुभ्र काही जीवघेणे       लेखक:अंबरीश मिश्र      राजहंस प्रकाशन    पाने:१५७       किंमत:१४०
 
                     पुस्तकाच्या मलपृष्ठावरील लिहिलेला संदर्भ अतिशय समर्पक शब्दात पुस्तकाबद्दल मत मांडतो.त्यात लेखक म्हणतो: कलेचा प्रवास धुंद करणारा असतो .यश,कीर्ती,मान -सन्मान हि या प्रवासातील रमणीय विश्राम् स्थळे असतील.परंतु प्रतिभेचा धूप जाळणारे मनस्वी कलावंत जीवनार्थाच मंथन करण्यातच  मग्न असतात "शुभ्र काही जीवघेणे" शोधत असतात.आपल्या प्रासादिक कलागुणांनी साहित्य,नाट्य,संगीत अन सिनेमाचा परिसर उजळून काढणारी सात कलंदर व्यक्तिमत्व या पुस्तकाला रेलून उभी आहेत.
         सात मनस्वी कलाकारांच्या जीवन कहाण्या आणि त्यांच्या प्रतिभा प्रवासाचा वृत्तांत या पुस्तकात चिरेबंद आहे .यातले शुभ्र काही जीवघेणे जे जे आहे ते या कलावंतांचे आहे,जे नकोसे वाटेल त्याला मी कारणीभूत आहे असं लेखक नम्रतापूर्वक लिहितो.
    चन्द्रदेवतेच गाणं हा शोभा गुर्टू वरील लेख आहे,अख्तरीबाई हा बेगम अख्तर यांच्या वरील लेख,चंद्रग्रहण हा सादत हसन मंटो  वरील लेख,ओ पी नय्यर ,पार्श्व नाथ आळतेकर ,
,सज्जाद  हुसैन,पंकज मलिक  हि इतर मंडळी.पुस्तकात प्रत्येकाची छान माहिती लेखकाने दिलीये.पुस्तक मस्त आहे . मुळता  सगळे लेख दिवाळी अंकामधून प्रसिद्ध झालेले आहेत व नंतर पुस्तकरूपाने प्रसिद्ध झालेले आहेत.पुस्तकामुळे  अनेक चांगल्या गुणी कलावंतांची,त्यांच्या आयुष्याची  आपल्याला ओळख होते.

Thursday 21 March 2013

मुंबईचे वर्णन --गोविंद नारायण माडगावकर (mumbaiche varnan-govind narayan madgaonkar)

पुस्तकाचे नाव:मुंबईचे वर्णन          गोविंद नारायण माडगावकर      समन्वय प्रकाशन                             पाने ३६०        किंमत:३५०

                            हे पुस्तक प्रथम १८६३ मध्ये प्रसिद्ध झाले .त्यानंतर जवळ जवळ १०० वर्षे ते दुर्लक्षित राहिले त्यानंतर २००१ साली ते पुनर्मुद्रित करण्यात आलेले आहे.न रा फाटकांनी प्रस्तावनेत लिहिलेय कि १८६३ मध्ये मुंबईची जी स्तिथी होती तिचे समग्र व सम्यक  दर्शन पुढच्या पिढीला घडावे अशी माडगावंकरांची आकांक्षा ह्या पुस्तकात सफल झालेली आहे.त्यांचे पुस्तकात तेव्हाच्या नागरिक जीवनाची बहुतेक सर्व अंगोपांगे आलेली आहेत.मुंबई ह्या नामांकित व वैभवाच्या शिखरावर चढलेल्या शहराचा साध्यंत वृतांत त्यांनी ह्या पुस्तकात  लिहिला आहे.
पुस्तकात एकूण १५ प्रकरणे  आहेत.त्यामध्ये  मग शहराची रचना,भाषा ,नामांकित स्थळे ,इंग्रजांची राजसत्ता ,मुळच्या स्थायिक लोकांची   माहिती,देवालायांची माहिती,रोगराई व तिची कारणे ,त्यावेळची शहराची रचना व माहिती (भायखळे ,माजगाव ,आर्थर बंदर,पोलोबंदर ,वाडिया बन्दर ,वरळी ,म्हातार पाखाडी,वालुकेश्वर ),आरमार,लष्कराची माहिती,लोकसंख्या,दुष्काळ व त्याचे निवारण,पारशी ,मुसलमान लोकांचे दंगे व त्यांचे निराकरण ,शहराचे उत्पन्न,नवे कर व त्यांची करणे,कोर्ट व न्यायव्यवस्था ,दवाखाने,पुस्तकालये,वेगवेगळे कारखाने व उद्योग धंद्यांची माहिती ई. काय काय लिहीलीले आहे.एकुणात त्यावेळच्या एकूण समाजव्यवस्थेच प्रतिबिंब त्यांच्या लेखनातून दिसून येतं .इंग्रजांची व्यवहार कुशलता,राज्य करण्याची पद्धती ह्यावर लेखकाने खूपच positively लिहिलेले आहे. ते लेखनासाठी त्यावेळच्या उपलब्ध साधनाचा,बखरीचा  व स्वताच्या सुक्ष्म अवलोकनाचा वापर त्यांनी केलाय.छोटे मोठे किस्से ,वर्णने सांगून त्यावेळचे चित्रच डोळ्यासमोर उभे केलेले आहे .जुन्या मुंबईचा अभ्यास करताना हे पुस्तक म्हणजे मैलाचा दगडच आहे असे जरूर सांगावेसे वाटते.वेळोवेळी दाखले म्हणून उदाहरणे,बखरीतील उतारे,जुन्या जाणत्यांची मते,श्लोक,अभंग,कवने,लोकाच्या त्यावेळच्या खोट्या भ्रामक समजुती ई सारे पानोपानी दिलेले आहे.
     पुस्तक नक्कीच वाचण्यासारखे आहे.बरीच माहिती जी आपणाला किवा आपल्या वाड  वडिलांना देखील माहिती नाही ती यायोगे आपल्याला वाचायला मिळते.पुस्तकातील काही वाक्ये येथे देत आहे तेणेकरून वाचकांना अंधुकशी कल्पना येईल कि पुस्तकात काय आहे ते.
माहीम आणि मुंबई वेगवेगळी बेटे होती
मुंबईची चार पाच सुट्टी बेटे होती-कुलाबा,महालक्ष्मी,वरळी,माजगाव,शिव

महालक्ष्मीस जाण्यास पूर्वी होडी लागत असे ती आजच्या कामाठीपुरातून जात असे

मुंबईत पूर्वी लुटारू लोकांचे भय असल्यामुळे जेव्हा इंग्रज प्रथम इथे आले तेव्हे त्यांनी रात्रीचे आठ वाजले म्हणजे तोफ मारावी आणि लोकास बाहेर न पडण्याची इशारत करावी आणि पहाटेच्या पाच कळकाच्या घंटा  वाजल्या आणि अरुणोदय झाला कि फिरून तोफ मारून लोकांस बाहेर फिरायची मोकळीक आहे अशी सूचना द्यावी अशी वहिवाट घातली होती.

त्यावेळी शेतास व माडास  मासळीचे खत घालीत त्यामुळे शेतातून व बागातून दुर्गंधी सुटे व लोकास उपद्रव होई १७२० मध्ये सरकारने त्यास मनाई केली.

१६९९ मधील एका पत्रात गवर्नर लिहितो,एथील लोक पादचारी आहेत,बसाय्जोगा मुंबईत एकच घोडा असून गाडीस जुम्पायाजोगी बैलांची एक जोडी आहे .

कुलाबा हे मुंबईच्या दक्षिणेच्या शेवटास लहानसे ओसाड बेत असून ढोरे चरण्याचे ठिकाण होते.

शिवचा पूल १७९७त बांधला त्यास ५०५७५ रुपये खर्च झाला हे द्रव्य रयतेकडून उत्पन्न करून घेण्यासाठी अशी युक्ती काढली कि या पुलावरून गाड्या घोडे पालक्या जातील येतील त्यांजकडून याप्रमाणे कर घ्यावा --बैलाच्या गाडीस अर्धा आणा,घोड्यास चार आणे,एका घोड्याच्या गाडीस अर्धा रुपया ,आणि दोन घोड्यांच्या गाडीस एक रुपया याप्रमाणे कर द्यावा .कालांतराने जे द्रव्य हा पूल बांधावयास खर्च पडले ते भरपाई होऊन चुकले तेव्हा लागलेच कर घेणे बंद झाले.

लोहार लोकांचे कारखाने व लोखंडी समान विक्नार्यान्ही दुकाने आहेत म्हणून त्याला लोहार चाळ म्हणतात 

कोणास मोठे शासन करायांचे असल्यास शहरांत दवंडी पिटवून त्यास तरीपार करीत म्हणजे त्याला पनवेल ,अलिबाग,उरण एथे नेउन सोडीत आणि त्याला शहरात येण्याचा प्रतिबंध करीत.हे त्यावेळचे काळेपाणी!

आजची बदलती चाळीशी--डॉ लिली जोशी (aajachi badalati chalishi-dr lili joshi)

पुस्तकाचे नाव:आजची बदलती चाळीशी    लेखिका :डॉ लिली जोशी       पद्मगंधा  प्रकाशन   पाने :२६०   किंमत:१५०
      
"आजची बदलती चाळीशी "हा लेख नोव्हेंबर १९९७ साली प्रथम साप्ताहिक सकाळ मध्ये प्रसिद्ध झाला .अनेक वाचकांनी या विषयावर पुस्तक लिहावे असे सुचवले.
  त्यांच्याकडे उपचारासाठी येणारे रुग्ण आणि अन्य परिचित यांच्याकडून त्यांनी एक समग्र प्रश्नावली भरून घेतली.त्यानुसार काही आखाडे ,अंदाज ,अनुमान आणि निष्कर्ष काढले .यामधून प्रस्तुत पुस्तक साकार झाले आहे.
    डॉ लिली  जोशी यांनी चाळीशी आणि नंतरच्या एकूणच जीवनप्रणाली विषयी त्याचप्रमाणे आहारशास्त्र ,व्यायामशास्त्र ,कामजीवन ,मृत्यू संकल्पना आणि अर्थकारण यांचाही विचार ह्या पुस्तकात केला आहे.चाळीशी हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा आहे.त्यानंतर आयुष्यात एक वेगळे वळण घ्यायचे असते ते कसे?हे समजावून घेण्यासाठी प्रस्तुत पुस्तक मार्गदर्शन करेल.
गेस्ट आर्टिकल  by :पंकज व. महाजन. २०/३/१३

Friday 15 March 2013

दुर्गदर्शन-- गो नी दांडेकर(durgadarshan go ni dandekar )

पुस्तकाचे नाव: दुर्गदर्शन              लेखक: गो नी दांडेकर           मृण्मयी प्रकाशन               पाने:१८४


दुर्गदर्शन हे गो नि दांच दुर्गभ्रमंती च्या निमित्ताने केलेलं ललीतम्य लेखन .दुर्गांवर त्याचं निरतिशय प्रेम होतं.दुर्गभ्रमण करताना इतिहासाचे साक्षीदार असणारे दुर्ग त्यांच्या मनात इतिहास काळातलं विश्व उभ करीत.तिथले भग्नावशेष         गोनिदांशी बोलू लागत .दुर्गांवरच्या निसर्गाचे अनेकानेक विभ्रम त्यांना मोहवित अन त्यांच भावविश्व संपन्न होई त्यातूनच हे लेखन झालं .दुर्गावर जाणारया अन जाणाऱ्या असंख्यांना दुर्गांकडे पहायची नवी दृष्टी दिली ---प्रस्तावनेत वीणा ,विजय देव
कुणास काय आवडते कुणास काय?तर मग मला जर किल्ले पाहत भटकणे आवडले ,तर त्याबद्दल कुणाच्या मनी खंत उपजू नये .किंबहुना किल्ले पाहणे,चान्दिण्यानी भरल्या त्यांच्यावरल्या रात्री स्वच्छदाने भोगणे,हे मला जडलेले व्यसन आहे.
   प्रस्तावनेत गो नि दानी  हे देखील लिहिलेय कि दुर्गदर्शन हे लहानगे पुस्तक मी केलेल्या दुर्ग भ्रमनातील काही दिवसांची दैनंदिनी आहे .या दैनंदिनीत अमुक किल्ला अमुक गावापासून इतके मैल ,अशी तपशील सांगणारी माहिती नोंदवलेली नाही.एका मनस्वी परीभ्रामकाच्या मनावर उठलेली प्रतिबिंबे या पुस्तकात आढळतील .मी आणि माझ्या मित्रांनी उन्हापावसाचे घाव कसे सोसले,याच्या क्वचित कधी केलेल्या नोंदी यात सापडतील.
   काही थोडे अदभुत जगता यावे काही थोडे साहस .एखादा कडा -फार मोठा नको -चढता यावा .एखाद्या अवघड वाटेने उतरता यावे.कुठे खरचटावे .कुठे ठेच लागावी.कुठे पाय मुरगळावा .कुठे घामाघूम व्हावे .कधी कडाडून तहान लागावी.कधी अपरंपार भूक लागावी.कुठे टळटळीत उन्हात भटकायला मिळावे. भणाभणा   वर अंगावर घेता  यावा .कधी काकडत्या थंडीत राने  पार करावी लागावीत.असे थोडे बेबंद जीवन.थोडे धोकेबाज.म्हणजे मग जगणे सुगंधी होते,त्याला एक निर्भयपण लागते.--दुर्गदर्शन
घरचे भाडे दहा रुपये महिना देतो .भिंतीना चिरा  पडल्या आहेत.कुटुंब सारखे ओरडत असते तेल संपले,गहू आणायला हवेत,तुमची धोतरे   फाटली.माझ्या कानी  आक्रोशच शिरत नाही.हि धरीत्रीमोलाची दोन लेणी माझ्या घरी आहेत.आता माझ्या एवढा येशवंत आणि धनवंत मला दुसरा कुणी दिसतच नाही  ---पाचाडला तुकनाना शेड्ग्यांकडे मिळालेली जिजाउंच्या देवघरातील व्यन्कटेशाची मूर्ती व शिवाजी महाराजांच्या पावलाचे ठसे घेतले त्या कथेच्या शेवटी गो नि दांचे उद्गार .
    पुस्तकात खूप छान छान वर्णनं   वाचायला  मिळतात मग ते दहा दिवसात दहा दुर्ग असो कि भर उन्हात सिद्धगड चढण्याची गोष्ट ,हरिश्चंद्रगड ,पन्हाळा ते खेळना.सगळ्या कथा रोमहर्षक आहेत. खऱ्या सह्यप्रेमीने वाचल्याच पाहिजेत.

Friday 8 March 2013

रात्र काळी... घागर काळी--चिं त्र्यं खानोलकर (ratara kali ghagar kali -c t khanolkar)

पुस्तकाचे नाव: रात्र काळी... घागर काळी             लेखक: चिं त्र्यं खानोलकर      मौज प्रकाशन      पाने २०३
                         

                   पुस्तकाबद्दल, लेखकाबद्दल बरच ऐकून होतो शेवटी एकदाचे रात्र काळी हाती लागले.एका बैठकीत मात्र नाही संपवता आले.त्यातील लिखाण,भाषा,कथा,पात्र सगळ अंगावर आलं.एखादा मानुस  एवढ दुखी जीवन कसा रेखाटू शकतो ह्यावर विश्वास नाही बसत.लेखन भयकथा नसले  तरी गुढतेकडे वळणारे आहे.नाही नाही हि गुढकथा नाही पण चिं त्र्यं च्या लेखनात असा काही  बाज आहे कि त्या अंधाऱ्या काळोखात आपल्याला सोडून देतात आणि आपण भटकत बसतो त्यातील पात्रांबरोबर त्यांची सूख दुःखं झेलत! भाषा शैली तर इतकी वेगळी कि प्रतीकात्मकता अशी पण असू शकते ह्यावर आपण दिग्मूढ होऊन  जातो .  
              अलौकिक सौंदर्य लाभलेली यज्ञेश्वर बाबाची कन्या लक्षी हि कथेची मुळ. नायिका नाही म्हणू शकत पण तिच्याभोवती कथा फिरत राहते.मंदिरात खड्या आवाजात रौद्र म्हणणाऱ्या दिगम्बराच्या आवाजावर भाळुन यज्ञेश्वर बाबा लक्ष्मी चे लग्न दिगंबर बरोबर करायचे ठरवतात व त्याच्या बापाला दास्याला तसे सांगतात.काहीही ध्यानीमनी नसताना केवळ वडिलांच्या सांगण्यावरून लक्ष्मी दिगम्बराशी  लग्न करते.पण दिगंबर म्हणजे मानसिकदृष्ट्या दुर्बल निघतो.असामान्य असं सौंदर्य सहज प्राप्त्य झालेलं असतानादेखील तो ते सहन करू शकत नाही.ते सौंदर्य त्याला पेलत नाही.लग्नाच्या पहिल्या क्षणापासुन त्या सौंदर्याचा त्याच्यावर इतका विलक्षण पगडा बसतो कि तिच्या सौंदर्या चीच त्याला भीती वाटू लागते  ते सौंदर्य निर्मळ  नाहीच ,एवढी सुंदर  स्त्री पवित्र असूच शकत नाही असे तो मनाने घेतो.पवित्र लक्ष्मीवर संशय घेतो तेव्हा लक्ष्मी तुटून पडते. नववधू म्हणून बाळगलेल्या सगळ्या अपेक्षा मातीमोल होतात.दिग्या एका क्षणी लक्ष्मीवर बलात्कार करतो व भ्रमिष्टासारखा निघून जातो.तीच आणि तेवढीच तिला लाभलेली पुरुषाची संगत. दिगंबर मग जाईकडे जातो पण तिथेदेखील तो टिकू शकत नाही.जाई हि भाविनीची मुलगी पण दिगम्बरवर जीवापाड प्रेम करणारी.पण दुर्बल मनोवृत्तीमुळे दिगंबर दूर निघून जातो .जाताना जेव्हा लक्ष्मी पोटुशी असते तेवा ते मुल आपल नव्हे ते पाप आहे असे तो दास्याला सांगतो.
      दास्या हा दुर्बल मनोवृत्तीचा कहर दाखवलेला आहे त्याला स्वतःला काही निर्णय घेत येत नाहीत त्यासाठी त्याला अच्युत ची मदत लागते.अच्युत हा त्याचा जिवाभावाचा मित्र.लक्ष्मीचं सौंदर्य सगळ्यांना तिच्याकडे आकर्षित करते ह्यातून दास्याही सुटू शकत नाही अन अच्युतही.दास्याच्या लक्ष्मीच्या साडीकडे पाहत राहण्याचा आणि ती हातात घेण्याचा प्रसंग खानोलकरांनी जबरदस्त लिहिलाय.अशा परिस्थितीत लक्ष्मी एकटी पडते व खिडकीतून पाहण्र्या केमळेकर वकिलांच्या घरात आश्रयाला जाते.पण तिथेदेखील तिच्या पदरी एकटच राहाण येत.केमळेकराना पण ते सौंदर्य झेपत नाही.केवळ पाहण्यापलीकडे ते काही करू शकत नाहीत .ते तिच्यासाठी दास्याच्या घरासमोर तिला घर बांधून देतात पण सहज साध्य  असताना देखील लक्ष्मीच्या दैवी सौंदर्याला स्पर्श करायला ते धजावत नाहीत.केमळेकरांच्या  सांगण्यावरून लक्ष्मीला वाणसामान पुरवणारा दाजी देखील तिच्याकडे आकर्षित होतो पण तोदेखील तिच्या शापित सौंदर्याला स्पर्श करण्याचे धाडस दाखवत नाही.लक्ष्मी सर्वस्व अर्पण करायला तयार असूनही दाजी लटका पडतो.ते अनिवार सौंदर्य त्याला विजेसारखा वाटत ते सहन करण्याची त्याची ताकद नसते तो वर्षानु वर्ष लक्ष्मीकडे येतो  व बसून निघून जातो.
                             लक्ष्मीचं पात्र म्हणजे विलक्षण गुंतागुंत आहे. तरुणी,नववधु,कुठलाच भावनिक आधार नसलेली पोटुशी स्त्री,शरीर सुखापासून वंचित राहिलेली स्त्री ,एवढ्या सगळ्यात ती व्यभिचारी आहे असा तिच्यावर लागलेला ठपका हे सगळा भोगत असलेल शापित अलौकिक सौंदर्य असलेल कोवळ तरुण शरीर.केवळ अशक्य आहे  हि कथा वाचण  म्हणजे. तिच्या मानसिक हिंदोळ्यांवर आपण स्वार होऊन तिच्या दुखात सामील होतो.त्यातून प्रत्येक वेळी निर्मल असूनदेखील चवचाल म्हणूनच तिची गावभर चर्चा होते ते दुखः तर ती कुणालाही सांगू शकत नाही तिचा स्वतःचा मुलगा देखील तिची हेटाळणी करतो.ह्या सगळ्यात मध्ये अनेक पात्र आली आहेत.
दास्याचा लक्ष्मीच्या सौंदर्यावर
वेडा झालेला वामन ,दाजी ची मुलगी सुमन,लक्ष्मी चा मुलगा सदा,नदीकाठी सापडलेली बेवारस बकुळ  ह्यांना घेऊन कथा पुढे सरकत राहते.कथा प्रत्यक्ष  वाचायलाच हवी तरच चिं त्र्यं च्या लेखनाची जादू अनुभवता  येईल.कादंबरी थोडी अपूर्ण वाटते.काही पात्रे अचानक समोर येतात.मला तितकीशी नाही आवडली.दुखी शेवट असल्यामुळे असेल कदाचित पण नाही ते एकच कारण नाही.दुखः सारी कथा व्यापून राहत ते काही कुठल्या एका भागासाठी नाही येत.कादंबरी वाचताना आपण सुन्न होऊन जातो.तितकीशी न आवडण्याचं कारण हे देखील असेल कि एखाद सौंदर्य एवढं अलौकिक असू शकत कि ते अप्राप्य वाटावं ??मला नाही पटत.एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत शक्य आहे पण कथेत येणार प्रत्येक पुरुष लक्ष्मीच्या सौंदर्याच्या तेजाने झाकोळला जावा व तिला स्पर्श देखील न करता (जेव्हा  कि ती साध्य आहे तेव्हा) तिचीच साधना करीत राहावा हे अशक्य वाटते .लक्ष्मी अशी रंगवली आहे कि कधी ती नायिका होते  कधी खलनायिका, कधी दैवी वाटते तर कधी शापित ,कधी प्रेमळ वाटते तर कधी कपटी तिची अनेकविध रूपे लेखकांनी लीलया रंगवली आहेत.
 कादंबरी एकदा तरी वाचावी.एकदा वाचून समजतही  नाही आणि झेपतही नाही इतका तिचा आवाका प्रचंड आहे.
विष्णुदास नाम्याच्या गवळणी वरून कादंबरीचे नाव घेतले असले तरी लेखकांनी लेखणीने काळोख भरून टाकलाय अक्ख्या पुस्तकात.त्यासाठी लेखकाला,त्याच्या  शैलीला  सलाम.
गवळण :  रात्र काळी ,घागर काळी,यमुना जळे ती काळी हो माय !
                 बुंथ काळी,बिलवर काळे ,गळामोती ऐकावळी  काळी हो माय