Friday 15 March 2013

दुर्गदर्शन-- गो नी दांडेकर(durgadarshan go ni dandekar )

पुस्तकाचे नाव: दुर्गदर्शन              लेखक: गो नी दांडेकर           मृण्मयी प्रकाशन               पाने:१८४


दुर्गदर्शन हे गो नि दांच दुर्गभ्रमंती च्या निमित्ताने केलेलं ललीतम्य लेखन .दुर्गांवर त्याचं निरतिशय प्रेम होतं.दुर्गभ्रमण करताना इतिहासाचे साक्षीदार असणारे दुर्ग त्यांच्या मनात इतिहास काळातलं विश्व उभ करीत.तिथले भग्नावशेष         गोनिदांशी बोलू लागत .दुर्गांवरच्या निसर्गाचे अनेकानेक विभ्रम त्यांना मोहवित अन त्यांच भावविश्व संपन्न होई त्यातूनच हे लेखन झालं .दुर्गावर जाणारया अन जाणाऱ्या असंख्यांना दुर्गांकडे पहायची नवी दृष्टी दिली ---प्रस्तावनेत वीणा ,विजय देव
कुणास काय आवडते कुणास काय?तर मग मला जर किल्ले पाहत भटकणे आवडले ,तर त्याबद्दल कुणाच्या मनी खंत उपजू नये .किंबहुना किल्ले पाहणे,चान्दिण्यानी भरल्या त्यांच्यावरल्या रात्री स्वच्छदाने भोगणे,हे मला जडलेले व्यसन आहे.
   प्रस्तावनेत गो नि दानी  हे देखील लिहिलेय कि दुर्गदर्शन हे लहानगे पुस्तक मी केलेल्या दुर्ग भ्रमनातील काही दिवसांची दैनंदिनी आहे .या दैनंदिनीत अमुक किल्ला अमुक गावापासून इतके मैल ,अशी तपशील सांगणारी माहिती नोंदवलेली नाही.एका मनस्वी परीभ्रामकाच्या मनावर उठलेली प्रतिबिंबे या पुस्तकात आढळतील .मी आणि माझ्या मित्रांनी उन्हापावसाचे घाव कसे सोसले,याच्या क्वचित कधी केलेल्या नोंदी यात सापडतील.
   काही थोडे अदभुत जगता यावे काही थोडे साहस .एखादा कडा -फार मोठा नको -चढता यावा .एखाद्या अवघड वाटेने उतरता यावे.कुठे खरचटावे .कुठे ठेच लागावी.कुठे पाय मुरगळावा .कुठे घामाघूम व्हावे .कधी कडाडून तहान लागावी.कधी अपरंपार भूक लागावी.कुठे टळटळीत उन्हात भटकायला मिळावे. भणाभणा   वर अंगावर घेता  यावा .कधी काकडत्या थंडीत राने  पार करावी लागावीत.असे थोडे बेबंद जीवन.थोडे धोकेबाज.म्हणजे मग जगणे सुगंधी होते,त्याला एक निर्भयपण लागते.--दुर्गदर्शन
घरचे भाडे दहा रुपये महिना देतो .भिंतीना चिरा  पडल्या आहेत.कुटुंब सारखे ओरडत असते तेल संपले,गहू आणायला हवेत,तुमची धोतरे   फाटली.माझ्या कानी  आक्रोशच शिरत नाही.हि धरीत्रीमोलाची दोन लेणी माझ्या घरी आहेत.आता माझ्या एवढा येशवंत आणि धनवंत मला दुसरा कुणी दिसतच नाही  ---पाचाडला तुकनाना शेड्ग्यांकडे मिळालेली जिजाउंच्या देवघरातील व्यन्कटेशाची मूर्ती व शिवाजी महाराजांच्या पावलाचे ठसे घेतले त्या कथेच्या शेवटी गो नि दांचे उद्गार .
    पुस्तकात खूप छान छान वर्णनं   वाचायला  मिळतात मग ते दहा दिवसात दहा दुर्ग असो कि भर उन्हात सिद्धगड चढण्याची गोष्ट ,हरिश्चंद्रगड ,पन्हाळा ते खेळना.सगळ्या कथा रोमहर्षक आहेत. खऱ्या सह्यप्रेमीने वाचल्याच पाहिजेत.

No comments:

Post a Comment