Thursday 15 November 2012

पानिपत असे घडले

पुस्तकाचे नाव :  पानिपत असे घडले

पब्लिशर : पुष्प प्रकाशन 

लेखक : संजय  क्षीरसागर 

पाने : ५८२       किंमत :५००रु (२०१२)

माहिती :  पानिपत बद्दल लोकांमध्ये कुतूहल,आकर्षण ,जिव्हाळा ,उत्सुकता हे सगळ   आहे .आतापर्यन्त ह्या विषयावर अनेक पुस्तक आली .विश्वास पाटील तर पानिपतकार ह्या नावाने ओळखले जातात.परंतु प्रस्तुत पुस्तकाचे वैशिष्ठ्य म्हणजे लेखक कोणताही दुराग्रह मनात न ठेवता लेखन करतो.व जे काही लिहिलंय त्यासाठी शक्य तितके  पुरावे देतो मग ते कधी कधी ३-४ बखरी मधले असतात तर कधी शेजवलकर,जदुनाथासारख्या दिग्गजांचे असतात .त्यासाठीच हे पुस्तक तब्बल ५८२ पानाचे झालेय.पुस्तक काही कथा नसून पानिपत वर टाकलेला खराखुरा प्रकाश आहे.पण आपल्या इतिहासामध्ये बरेच पुरावे हे तितकेसे ग्राह्य देखील मानता येत नाहीत(काही बखरी मधील सनावळी व प्रसंग / वर्णन इ )त्यामुळे काही घटना ह्या केवळ assumptions करू शकतो.असे असले तरी निष्पक्ष पणे  लिहिलेले हे पुस्तक नक्कीच मस्ट रीड आहे .
                  केवळ पानीपत वाचलेल्यांनी जरूर वाचावे जेणेकरून एकांगी दृष्टी न राहता इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यापक होतो.काही घटनांचा सारासार विचार पण आपण करू शकतो .ज्या ठिकाणी उतारे,जुनी  पत्रे किंवा बखरीमधील काही भाग दिले आहेत तो भाग काहीसा वाचावायास कठीण जातो पण बाकी पुस्तकाची भाषा शैली व्यवस्थित आहे.

No comments:

Post a Comment